मराठी व्याकरण प्रश्न
Question : 1
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास --------------- म्हणतात
📝 स्पष्टीकरण : ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य (कर्ता) आणि एकच विधेय (क्रियापद) असते, त्यास केवल वाक्य (शुद्ध वाक्य) म्हणतात.
1) उद्देश्य म्हणजे काय ? वाक्यात ज्याबद्दल काही सांगितले जाते ती व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थान म्हणजे उद्देश्य
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे राम हा उद्देश्य आहे कारण त्याच्याबद्दल काही सांगितले आहे
2) विधेय म्हणजे काय ? वाक्यात उद्देश्याबद्दल काय सांगितले आहे, त्याला विधेय म्हणतात .
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे रोज क्रिकेट खेळतो हे विधेय आहे कारण राम काय करतो हे सांगितले आहे
1) उद्देश्य म्हणजे काय ? वाक्यात ज्याबद्दल काही सांगितले जाते ती व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थान म्हणजे उद्देश्य
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे राम हा उद्देश्य आहे कारण त्याच्याबद्दल काही सांगितले आहे
2) विधेय म्हणजे काय ? वाक्यात उद्देश्याबद्दल काय सांगितले आहे, त्याला विधेय म्हणतात .
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे रोज क्रिकेट खेळतो हे विधेय आहे कारण राम काय करतो हे सांगितले आहे
Question : 2
खाली दिलेल्या पर्यायातील बरोबर विधान असलेला पर्याय निवडा ?
📝 स्पष्टीकरण : वाक्याच्या रचनेनुसार तीन प्रकार पडतात: केवल वाक्य, संयुक्त वाक्य, आणि मिश्र वाक्य. त्यामुळे पर्याय 2 हे योग्य विधान आहे.
Question : 3
खालील पर्यायी उत्तरातून केवल वाक्य कोणते ते सांगा ?
📝 स्पष्टीकरण : "तो जोराने धावत असताना पडला" या वाक्यात एकच मुख्य विधान व एकच मुख्य क्रियापद (पडला) असल्यामुळे हे केवल वाक्य आहे.
Question : 4
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा - दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली
📝 स्पष्टीकरण : या वाक्यात एकच उद्देश्य (जांभळाची झाडे) आणि एकच विधेय (दिसली) आहे, म्हणून हे केवल वाक्य आहे.
Question : 5
पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा - व्यायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे ?
📝 स्पष्टीकरण : रचनेच्या दृष्टीने या वाक्यात एकच विधान व एकच क्रियापद असल्यामुळे हे केवल वाक्य आहे.
Question : 6
केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे ----
📝 स्पष्टीकरण : केवल वाक्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकच उद्देश्य (कर्ता) व एकच विधेय (क्रियापद) असते.
Question : 7
आम्ही जातो आमुच्या गावा - या वाक्याचा प्रकार कोणता ?
📝 स्पष्टीकरण : या वाक्यात एकच कर्ता (आम्ही) व एकच क्रियापद (जातो) आहे, त्यामुळे हे केवल वाक्य आहे.
Question : 8
शेजारचे घर पावसाळ्यात गळते. या वाक्याचा प्रकार ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : हे वाक्य साधे व सुटसुटीत असून यात एकच विधेय (गळते) असल्यामुळे हे केवल वाक्य आहे.
Question : 9
जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययांनी जोडली तर ----------- वाक्य तयार होते
📝 स्पष्टीकरण : दोन किंवा अधिक स्वतंत्र/केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी (आणि, व, पण, परंतु, म्हणून इत्यादी) जोडली जातात, तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात.
Question : 10
पुढील वाक्ये वाचा —
1) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र जोडलेली असतात.
2) मिश्र वाक्यात प्रधान वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते.
3) तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये हे संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे.
वरीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
1) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र जोडलेली असतात.
2) मिश्र वाक्यात प्रधान वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते.
3) तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये हे संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे.
वरीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
📝 स्पष्टीकरण : विधान 1 आणि 2 बरोबर आहेत, परंतु विधान 3 चुकीचे आहे कारण हे वाक्य संयुक्त वाक्याचे उदाहरण नाही. त्यामुळे फक्त 3 चूक हे योग्य उत्तर आहे.
विधान - 1 बरोबर आहे . कारण -
संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्ये किंवा प्रधान वाक्ये समान पातळीवर (अर्थासाठी एकमेकांवर अवलंबून नसलेली) असतात .
ही वाक्ये समानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. आणि, व, अन, किंवा, अथवा, पण, परंतु, म्हणून इ.) जोडलेली असतात .
उदाहरण : "त्याने अभ्यास केला आणि तो पास झाला." ( येथे दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत )
विधान - 2 बरोबर आहे . कारण
मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य (मुख्य अर्थ व्यक्त करणारे) आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य असते.
ही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडलेली असतात.
उदाहरण : "जर पाऊस आला, तर मी शाळेत जाणार नाही." ( येथे 'मी शाळेत जाणार नाही' हे प्रधान वाक्य 'जर पाऊस आला' या गौण वाक्यावर अवलंबून आहे )
विधान - 3 चूक आहे . कारण -
'तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये' हे वाक्य मिश्र वाक्य आहे.
या वाक्यात 'तर' या गौणत्वसूचक अव्ययाचा वापर केला गेला आहे. हे वाक्य एका विशिष्ट अटीवर किंवा तुलनेवर आधारित आहे, त्यामुळे ते मिश्र वाक्याचा प्रकार आहे.
'तर' हे उद्देश/परिणाम किंवा शर्त दर्शवते
विधान - 1 बरोबर आहे . कारण -
संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्ये किंवा प्रधान वाक्ये समान पातळीवर (अर्थासाठी एकमेकांवर अवलंबून नसलेली) असतात .
ही वाक्ये समानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. आणि, व, अन, किंवा, अथवा, पण, परंतु, म्हणून इ.) जोडलेली असतात .
उदाहरण : "त्याने अभ्यास केला आणि तो पास झाला." ( येथे दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत )
विधान - 2 बरोबर आहे . कारण
मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य (मुख्य अर्थ व्यक्त करणारे) आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य असते.
ही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडलेली असतात.
उदाहरण : "जर पाऊस आला, तर मी शाळेत जाणार नाही." ( येथे 'मी शाळेत जाणार नाही' हे प्रधान वाक्य 'जर पाऊस आला' या गौण वाक्यावर अवलंबून आहे )
विधान - 3 चूक आहे . कारण -
'तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये' हे वाक्य मिश्र वाक्य आहे.
या वाक्यात 'तर' या गौणत्वसूचक अव्ययाचा वापर केला गेला आहे. हे वाक्य एका विशिष्ट अटीवर किंवा तुलनेवर आधारित आहे, त्यामुळे ते मिश्र वाक्याचा प्रकार आहे.
'तर' हे उद्देश/परिणाम किंवा शर्त दर्शवते
Question : 11
संयुक्त वाक्यातील पोटवाक्य प्रधान वाक्याशी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, उभयान्वयी अव्यय वेगळी केली की, सर्व पोटवाक्ये केवल वाक्ये राहतात. हे विधान ------++
📝 स्पष्टीकरण : संयुक्त वाक्यातील सर्व पोटवाक्ये ही स्वतंत्र असतात. उभयान्वयी अव्यय काढून टाकल्यास ती प्रत्येकी स्वतंत्र केवल वाक्ये बनतात. म्हणून हे विधान संपूर्ण बरोबर आहे.
Question : 12
दोन केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात ?
📝 स्पष्टीकरण : प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडल्या जाणाऱ्या वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात.
Question : 13
पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा —
1). उन्हाळा वाढत होता.
2). पाऊस पडत नव्हता.
1). उन्हाळा वाढत होता.
2). पाऊस पडत नव्हता.
📝 स्पष्टीकरण : दोनही वाक्ये भूतकाळात आहेत आणि ती समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 'आणि' द्वारे जोडल्याने "उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता" हे अचूक संयुक्त वाक्य बनते.
Question : 14
तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला - या वाक्यातील प्रकार ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : 'म्हणून' हे परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असल्याने हे संयुक्त वाक्य आहे.
Question : 15
तो पडला आणि रडू लागला - दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : 'आणि' या समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक अव्ययाने दोन स्वतंत्र वाक्ये जोडली गेल्याने हे संयुक्त वाक्य आहे.
Question : 16
पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा —
1). गीताने कबूतरे मोजून पाहिली.
2). ती पंधराच होती.
1). गीताने कबूतरे मोजून पाहिली.
2). ती पंधराच होती.
📝 स्पष्टीकरण : 'पण' हे न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय जोडून तयार केलेले "गीताने कबूतरे मोजली पण ती पंधराच होती" हे योग्य संयुक्त वाक्य आहे.
Question : 17
पुढील विधान वाचा — प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्य असतात.
📝 स्पष्टीकरण : प्रधानत्वसूचक अव्ययांनी जोडलेली वाक्ये संयुक्त असतात व गौणत्वसूचक अव्ययांनी जोडलेली वाक्ये मिश्र असतात. हे नियम सत्य असल्याने संपूर्ण विधान बरोबर आहे.
Question : 18
पुढील विधाने वाचा —
1). मिश्र वाक्यात एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय असते.
2). मिश्र वाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते.
3). मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
4). मिश्र वाक्यात क्रियापद नसते. योग्य विधानांचा पर्याय निवडा.
1). मिश्र वाक्यात एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय असते.
2). मिश्र वाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते.
3). मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
4). मिश्र वाक्यात क्रियापद नसते. योग्य विधानांचा पर्याय निवडा.
📝 स्पष्टीकरण : विधान अ आणि क बरोबर आहे
मिश्र वाक्य हे एक प्रधान वाक्य (मुख्य वाक्य) आणि त्यावर अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य (उपवाक्य) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडून तयार होते.
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ बरोबर आहे . कारण -
जरी मिश्र वाक्यात एकापेक्षा जास्त उपवाक्ये (गौण वाक्ये) असली तरी, संपूर्ण वाक्य हे एकाच विधानाचा अर्थ व्यक्त करत असते .
त्यातील प्रधान वाक्य हेच त्या संपूर्ण वाक्याचे मुख्य उद्देश (कर्ता) आणि मुख्य विधेय (क्रिया) दर्शवते.
मिश्र वाक्य हे एकच संमिश्र वाक्य मानले जाते
विधान : ब चूक आहे . कारण -
गौण वाक्य हे नेहमी प्रधान वाक्यावर अर्थासाठी अवलंबून असते. ते स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही.
उदाहरणार्थ : "जेव्हा पाऊस सुरू झाला" (गौण वाक्य) - याचा अर्थ पूर्ण होत नाही. पूर्ण अर्थासाठी "तेव्हा तळी वाहू लागली" (प्रधान वाक्य) हे आवश्यक असते.
विधान : क बरोबर आहे . कारण -
मिश्र वाक्य किमान दोन वाक्यांनी (एक प्रधान + एक गौण) बनलेले असते आणि प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असते. त्यामुळे, मिश्र वाक्यात नेहमी दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
उदाहरणार्थ : "जो मेहनत करतो, तो यश मिळवतो." ( येथे 'करतो' आणि 'मिळवतो' ही दोन क्रियापदे आहेत )
विधान : ड पूर्णपणे चूक आहे . कारण -
मिश्र वाक्ये अनेक लहान वाक्यांनी मिळून बनलेली असतात आणि प्रत्येक वाक्यात (प्रधान किंवा गौण) अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद असणे आवश्यक असते.
मिश्र वाक्य हे एक प्रधान वाक्य (मुख्य वाक्य) आणि त्यावर अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य (उपवाक्य) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडून तयार होते.
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ बरोबर आहे . कारण -
जरी मिश्र वाक्यात एकापेक्षा जास्त उपवाक्ये (गौण वाक्ये) असली तरी, संपूर्ण वाक्य हे एकाच विधानाचा अर्थ व्यक्त करत असते .
त्यातील प्रधान वाक्य हेच त्या संपूर्ण वाक्याचे मुख्य उद्देश (कर्ता) आणि मुख्य विधेय (क्रिया) दर्शवते.
मिश्र वाक्य हे एकच संमिश्र वाक्य मानले जाते
विधान : ब चूक आहे . कारण -
गौण वाक्य हे नेहमी प्रधान वाक्यावर अर्थासाठी अवलंबून असते. ते स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही.
उदाहरणार्थ : "जेव्हा पाऊस सुरू झाला" (गौण वाक्य) - याचा अर्थ पूर्ण होत नाही. पूर्ण अर्थासाठी "तेव्हा तळी वाहू लागली" (प्रधान वाक्य) हे आवश्यक असते.
विधान : क बरोबर आहे . कारण -
मिश्र वाक्य किमान दोन वाक्यांनी (एक प्रधान + एक गौण) बनलेले असते आणि प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असते. त्यामुळे, मिश्र वाक्यात नेहमी दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
उदाहरणार्थ : "जो मेहनत करतो, तो यश मिळवतो." ( येथे 'करतो' आणि 'मिळवतो' ही दोन क्रियापदे आहेत )
विधान : ड पूर्णपणे चूक आहे . कारण -
मिश्र वाक्ये अनेक लहान वाक्यांनी मिळून बनलेली असतात आणि प्रत्येक वाक्यात (प्रधान किंवा गौण) अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद असणे आवश्यक असते.
Question : 19
वाक्यविचारात मिश्रवाक्य या वाक्य प्रकाराचा विचार केला जातो. यात —
1). एकच केवल वाक्य असते
2). गौण वाक्याचा मुळीच विचार केला जात नाही
3). जे-ते, जेव्हा-तेव्हा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो
4). केवळ प्रधान वाक्यावरच भागते
योग्य विधान कोणते ?
1). एकच केवल वाक्य असते
2). गौण वाक्याचा मुळीच विचार केला जात नाही
3). जे-ते, जेव्हा-तेव्हा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो
4). केवळ प्रधान वाक्यावरच भागते
योग्य विधान कोणते ?
📝 स्पष्टीकरण : 👉 विधान क बरोबर आहे
मिश्र वाक्य हे एक प्रधान वाक्य आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य यांनी मिळून बनलेले असते. ही वाक्ये एकमेकांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात .
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ चूक आहे कारण -
केवल वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते . मिश्र वाक्यात प्रधान वाक्य आणि किमान एक गौण वाक्य असते, त्यामुळे ते केवळ एकच केवल वाक्य नसते.
विधान : ब चूक आहे . कारण -
मिश्र वाक्याच्या रचनेत गौण वाक्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. गौण वाक्याशिवाय मिश्र वाक्य पूर्ण होत नाही . (उदा. कारण, जर, जेव्हा, की इ.)
विधान : क बरोबर आहे . कारण -
'जे-ते' (संबंधबोधक) आणि 'जेव्हा-तेव्हा' (कालवाचक) ही गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये आहेत.
ही अव्यये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य यांना जोडून मिश्र वाक्य तयार करतात.
उदाहरणे :
जे अभ्यास करतात, ते पास होतात. (संबंधबोधक)
जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा आम्ही निघालो. (कालवाचक)
विधान : ड चूक आहे . कारण -
केवल प्रधान वाक्याने अर्थ पूर्ण झाला तर ते केवल वाक्य किंवा संयुक्त वाक्याचा भाग असू शकते.
मिश्र वाक्यात अर्थाची पूर्णता आणि विशिष्ट संबंध स्पष्ट करण्यासाठी गौण वाक्याची आवश्यकता असते. केवळ प्रधान वाक्यावर मिश्र वाक्य बनत नाही
मिश्र वाक्य हे एक प्रधान वाक्य आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य यांनी मिळून बनलेले असते. ही वाक्ये एकमेकांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात .
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ चूक आहे कारण -
केवल वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते . मिश्र वाक्यात प्रधान वाक्य आणि किमान एक गौण वाक्य असते, त्यामुळे ते केवळ एकच केवल वाक्य नसते.
विधान : ब चूक आहे . कारण -
मिश्र वाक्याच्या रचनेत गौण वाक्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. गौण वाक्याशिवाय मिश्र वाक्य पूर्ण होत नाही . (उदा. कारण, जर, जेव्हा, की इ.)
विधान : क बरोबर आहे . कारण -
'जे-ते' (संबंधबोधक) आणि 'जेव्हा-तेव्हा' (कालवाचक) ही गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये आहेत.
ही अव्यये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य यांना जोडून मिश्र वाक्य तयार करतात.
उदाहरणे :
जे अभ्यास करतात, ते पास होतात. (संबंधबोधक)
जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा आम्ही निघालो. (कालवाचक)
विधान : ड चूक आहे . कारण -
केवल प्रधान वाक्याने अर्थ पूर्ण झाला तर ते केवल वाक्य किंवा संयुक्त वाक्याचा भाग असू शकते.
मिश्र वाक्यात अर्थाची पूर्णता आणि विशिष्ट संबंध स्पष्ट करण्यासाठी गौण वाक्याची आवश्यकता असते. केवळ प्रधान वाक्यावर मिश्र वाक्य बनत नाही
Question : 20
मिश्र वाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे मिश्रण असते ?
📝 स्पष्टीकरण : मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य (मुख्य वाक्य) आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये (अवलंबून असणारी वाक्ये) असतात.
Question : 21
जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही - हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे
📝 स्पष्टीकरण : 'जर... तर' हे संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असल्याने हे मिश्र वाक्य आहे.
Question : 22
माझा विश्वास आहे, की मी नक्की पास होईल - ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे ?
📝 स्पष्टीकरण : 'की' हे स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय जोडून तयार झालेले वाक्य मिश्र वाक्य असते.
Question : 23
खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : 'जेव्हा... तेव्हा' या गौणत्वसूचक अव्ययांनी जोडलेले "आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो" हे मिश्र वाक्य आहे.
Question : 24
पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते? योग्य पर्याय निवडा.
📝 स्पष्टीकरण : पर्याय 1, 2 आणि 3 ही तीनही वाक्ये गौणत्वसूचक अव्ययांनी ('जितके... तितकेच', 'की', 'जो... तो') जोडलेली असल्याने वरील सर्व वाक्य मिश्र वाक्ये आहेत.
Question : 25
ही गोष्ट फार प्राचीन काळातील आहे - या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : वाक्याचा मूळ अर्थ न बदलता नकारार्थी करताना 'प्राचीन' चा विरुद्धार्थी शब्द 'अर्वाचीन' वापरून "ही गोष्ट अर्वाचीन काळातील नाही" असे योग्य रूप बनते.
Question : 26
वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना ------- म्हणतात
📝 स्पष्टीकरण : क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, उपदेश, प्रार्थना किंवा आशीर्वाद या गोष्टींचा बोध होत असल्यास त्यास आज्ञाार्थी वाक्य म्हणतात.
Question : 27
कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते ?
📝 स्पष्टीकरण : ज्या वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा व्यक्त होते, त्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात (क्रियापदाचे रूप साधारणतः 'वा, वी, वे' असे असते).
Question : 28
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा ?
📝 स्पष्टीकरण : ज्या वाक्यात कोणतीतरी अट किंवा अटदर्शक भावना व्यक्त होते (उदा. 'जर... तर'), त्यास संकेतार्थी वाक्य म्हणतात.
Question : 29
अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता - या वाक्याचा प्रकार कोणता ?
📝 स्पष्टीकरण : या वाक्यात 'अभ्यास केला असता तर' ही अट/संकेत दर्शवला आहे, म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे.
Question : 30
योग्य जोड्या जुळवा :
| गट - अ (वाक्य) | गट - ब (वाक्य प्रकार) |
| अ) मी आंबा खाल्ला | 1) आज्ञार्थी वाक्य |
| ब) तुला परीक्षेत यश मिळो | 2) संकेतार्थी वाक्य |
| क) हे काय तोच करू जाणे | 3) स्वार्थी वाक्य |
| ड) जर त्याने मदत केली असती तर माझे काम झाले असते | 4) विध्यर्थी वाक्य |
📝 स्पष्टीकरण : अ) मी आंबा खाल्ला = स्वार्थी वाक्य (केवळ काळाचा बोध)
ब) तुला परीक्षेत यश मिळो = आज्ञाार्थी वाक्य (आशीर्वाद)
क) हे काय तोच करू जाणे = विध्यर्थी वाक्य (योग्यता)
ड) जर त्याने मदत केली असती... = संकेतार्थी वाक्य (अट)
Your Scorecard
Total Questions
0
Solved Question
0
Correct
0
Wrong
0
Final Score : 0 / 0
