पी.बी.पाटील समिती बद्दल संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील पंचायत राज्यव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली महत्त्वाची समिती म्हणजे प्राचार्य पी. बी. पाटील समिती.
P.B.Patil Samiti
- समिती : प्रा. पी. बी. पाटील समिती
- स्थापना : 18 जून 1984
- अध्यक्ष : प्रा. पी. बी. पाटील
- सदस्य : 8
पी.बी.पाटील समिती मधील सदस्यांची नावे :
- शहाजीराव पाटील
- रणजीत देशमुख
- दादासाहेब लिमये
- आनंद नाडकर्णी
- शामराव कदम
- सुब्रमण्यम एस
- वामनराव गड्डमवार
- प्रभाकर रुपवते
प्रा. पी. बी. पाटील समितीचा उद्देश :
पंचायत राज व्यवस्थेचे पुनर्विलोकन करणे. म्हणून या समितीला पंचायत राज पुनर्विलोकन समिती असेही म्हणतात.
अहवाल सादर :
समीतीने जून 1986 रोजी राज्य सरकारला अहवाल सादर केला .
समितीच्या शिफारशी
- पंचायतीच्या निवडणूका वेळेवर व नियमित होण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण करावी.
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व जिल्हा परिषद अधिनियम 1961 यांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र महाराष्ट्र पंचायतराज अधिनियम तयार करावा.
- आर्थिक विकेंद्रीकरणावर भर द्यावा. कृषी व ग्रामीण लघुउद्योगांना चालना द्यावी.
- जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे नाव बदलून "जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ" करावे.
- ग्रामपंचायत व तालुका स्तरावर लोक न्यायपंचायतीची स्थापना करावी.
- जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करावे.
- शिक्षण विषय राज्याने पंचायतराजकडे सोपवावा.
- पंचायतराज व्यवस्थेसाठी स्वतंत्र नोकरशाही असावी — स्थानिक स्वराज्य सेवा निर्माण करावी.
- जिल्हा पातळीवर स्थानिक स्वराज्य परिषदेची स्थापना करावी.
- पंचायतराज प्रशिक्षणासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी.
- जिल्हा विकास आयुक्त पद निर्माण करून IAS अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
- जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार वगळून उर्वरित अधिकार जिल्हा विकास आयुक्ताकडे द्यावेत.
■ ग्रामपंचायतबद्दल शिफारशी
- 2000 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना.
- ग्रामपंचायतीचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर करावे.
- सदस्य संख्या किमान 7 व कमाल 21 असावी.
- सरपंचाची थेट निवड करावी.
- प्रत्येक महसूल गावात स्वतंत्र ग्रामसभा असावी.
- ग्रामसभा व ग्रामपंचायतीला अधिक अधिकार द्यावेत.
- सरपंचाला मानधनाऐवजी आतिथ्य भत्ता द्यावा.
- 30 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिका मध्ये करावे.
- लोकनियुक्त पंचसभा असावी — किमान 20 व कमाल सदस्य.
- पंचसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा व बैठक दर 3 महिन्यांनी घ्यावी.
■ पंचायत समितीबद्दल शिफारशी
- 1 लाख लोकसंख्येच्या क्षेत्रात पंचायत समितीची स्थापना.
- डोंगराळ भागात किमान 50 हजार लोकसंख्या असावी.
- सरपंचांना पंचायत समितीत सहभाग द्यावा.
- जिल्हा परिषद सदस्य व नगरपालिका अध्यक्ष यांचा समावेश.
- सभापती हे जिल्हा परिषदेस पदसिद्ध सदस्य असावेत.
- निवडणूका अप्रत्यक्ष पद्धतीने घ्याव्यात.
■ जिल्हा परिषदबद्दल शिफारशी
- 15-20 लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषद स्थापावी.
- सदस्य संख्या किमान 40 व कमाल 75.
- महिलांसाठी किमान 25% राखीव जागा.
- SC/ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव.
- आमदार-खासदारांना प्रतिनिधित्व न देता येणे.
- पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावेत.
- शैक्षणिक अट नसावी.
- अध्यक्ष व उपाध्यक्षांनी 10 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये.
- अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांची गरज.
- एकदा फेटाळल्यास 1 वर्ष मांडता येणार नाही.
- जिल्हा परिषदेमध्ये खालील 8 विषय समित्या असाव्यात :
- सामान्य प्रशासन व वित्त समिती
- कृषी समिती
- उद्योग समिती
- बांधकाम समिती
- कार्यकारी समिती
- कृषी मंडळ
- आरोग्य समिती
- समाजकल्याण व आदिवासी कल्याण समिती
❒ पी.बी.पाटील समितीचा अहवाल
समितीने जून 1986 रोजी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. काही शिफारशी स्वीकृत करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात बदल करण्यात आले.
हे पण वाचा
- पंचायतराज बद्दल माहिती
- 73 वी घटनादुरुस्ती
- वसंतराव नाईक समिती
- बलवंतराय मेहता समिती
- ग्रामसेवक माहिती
- महान्यायवादी बद्दल माहिती
- महाधिवक्ता माहिती
- महानगरपालिका आयुक्त माहिती
- GVK Rao समिती
- पी.बी. पाटील समिती
- पोलीस पाटील माहिती
- 74 वी घटनादुरुस्ती
- नगरपरिषद माहिती
- औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण
- कोतवाल माहिती